गझल

गझल

पारखी

जाणीव वेदनांची ही सारखी कशाला ?
माझ्याच वैभवाला मी पारखी कशाला ?

माझे नसून राही माझ्याच अंतरी जे,
ते सौख्य साद घाली मज सारखी कशाला ?

गीतांत रंगले जे, चित्तात कोरले जे,
ते नाव आज येई माझ्या मुखी कशाला ?

त्या शांत सागराला वेढून वादळांनी
अस्वस्थ मी, तयाची झाले सखी

कविता


वेड्यास एक सुचली वेड्या क्षणात कविता
टाळून चांदण्याला बसली उन्हात कविता

"फुरसत मिळेल तेव्हा मीही लिहीन" म्हणतो...
तोवर उरेल ना पण माझ्या उरात कविता?

गरजा नव्या युगाच्या जाणा; जमेल दोन्ही -
जमवा खिशात पैसा; जगवा मनात कविता

उकलून सर्व जेव्हा येतील विश्वसूत्रे
राहील काय त्याही नंतर जगात कविता?

कळतो अजून रोजच

मनासारखे


हसू खुलू दे मनासारखे
जरा घडू दे मनासारखे

तुझी दिठी केसांत माळुनी
मला सजू दे मनासारखे

मुठीत बांधू नको कळीला
तिला फुलू दे मनासारखे

खुळे तुझ्या स्वप्नात जागते,
मना करू दे मनासारखे

दंवात न्हाते पहाट ओली,
धुके झरू दे मनासारखे

सुरांसवे माझ्या काव्याचे
दुवे जुळू दे मनासारखे

पसायदानी मागे ज्ञाना,
जनां मिळू दे मनासारखे



काळजी

जायचे असल्यास जा पण वेळ आहे आंधळी
सोबतीला गंध ने तू, घे, चुरड ही पाकळी

जीवघेण्या वादळाशी झुंजणे नव्हते नवे
बरसणार्‍या आसवांनी घेतला माझा बळी

पापणी मिटताच अजुनी वाटते दिसशील तू
अजुनही केवळ तुला ती वाट आहे मोकळी

दु:ख विरहाचे तुझ्या कोंडू नये मेघांतरी
शिंपल्यामधुनी पडावे दान माझ्या ओंजळी

चल

सत्य

संबंध जोडुनीया पेचांत अडकलेले
जवळून पाहिले मी काही दुरावलेले

आश्चर्य वाटले की हृदयांस ना उमगले
झटकून टाकलेले होते स्थिरावलेले

समजून रीत घ्या हो.. अंती जगात असती
पहिले प्रकाश देता दुसरे प्रकाशलेले

पाहून रिक्त नजरा माझे मला समजले
इतके मला कुणीही नव्हते चितारलेले

आहे प्रकाश ज्याचा राहील तोच अंती
विरतील चंद्र सारे एकेक माळलेले

कशाला फुलांनी

मला नेमके भेटती जे नको ते -

फुलांनी करावा कशाला खुलासा..
जरी चोरला गंध त्यांचा जरासा

मला नेमके भेटती जे नको ते -
कधी पत्र, पत्ता  मिळेना हवासा..

कधी भेट होईल माझी नभाशी?
धरेला मिळू दे सरीचा दिलासा...

मला पाहिजे ते उमगले तरीही
तुझ्यासारखा हा उलटतोच  फासा

किती टाळले मी  तरीही अडकतो
तुझी आठवण आणि ठसका जरासा...

मला टाळते ती

अर्थ

सांगून अर्थ सारे तुजला कळे न काही
कळले कसेबसे... जे वळले असे न काही

एकाच बंधनाने बधलो जरूर होतो
जाळून हृदय माझे, जळले तुझे न काही

जखमा अनेक होत्या फांदीवरी फुलांच्या
तोडून वृक्ष, जखमा पुसल्या असे न काही

मिळवून लाख रत्ने गुर्मीत वर्ष गेली
तो एक दिवस येता माझे उरे

वारसा

घाव घालुन मीठ त्यावर चोळण्याचा
हाच होता रोख त्याच्या बोलण्याचा

क्रूरतेला राहिली सीमा न काही
छंद त्याला सावजाशी खेळण्याचा

मंदिराची देणगी ही लाच 'त्या'ला,
की तराजू पापपुण्ये तोलण्याचा?

जीवघेणा खेळ आता सोड वेड्या,
कोवळ्या, ताज्या कळ्यांना जाळण्याचा

उंच जाताना न होते भान याचे,
झोकही जाईल फिरत्या पाळण्याचा!

"आज मी कामात

मी व्यथांना अंतरीचे गाव देतो

मी व्यथांना अंतरीचे गाव देतो
आसवांना पावसाचे नाव देतो

सागराने ऐनवेळी घात केला
वादळाहातीच आता नाव देतो

नेमकी येते भराया जखम जेव्हा
सांत्वनाचा स्पर्श तेव्हा घाव देतो

मागतो जो तो फुले ताजीतवानी
कोण निर्माल्यास येथे भाव देतो

खेळूनी झाले पुरे आयुष्य माझे
ये अरे मृत्यो! तुलाही डाव देतो

हासलो आजन्म

जाहले तारे किती ?

भेटलेल्या चांदण्यांना उडविती वारे किती !
पाहिजे होते तयांना नेमके 'घारे' किती ?

सोडुनी शरमेस जेंव्हा घातली जी साद तू..
भेटण्या आतूर मी... पण बंद ती दारे किती !

भक्त मोठा दाविला त्यांनी मला, पण हाय! तो -
मानवाला सोडुनी दगडांस गोंजारे किती !

फासुनी शेंदूर वरती फूलमाळा चढविता...
आंधळ्या-बहिर्‍यासमोरी