गझल

गझल

कुणी माझ्यासवे यावे

इथे मी लाख सांगावे, कुणी ते का स्विकारावे ?
'कुणी ज्ञानासवे जावे, कुणी माझ्यासवे यावे'

नकारा झेलण्या तुझिया कधीचा मी तयाराहे
तिथे तू पोचली नाहीस तर मी काय मागावे ?

सदाचा घोळ हा माझा तिच्या प्रीतीत गुरफटला
असे मी काय केले की तिने गुंतेच सोडावे ?

मनाचा थांग माझ्या मी

रात्र आधी मोजतो

रात्र आधी मोजतो
स्वप्न मग मी बेततो


श्वास थोडे मोडुनी
दिवस नगदी आणतो


ओळखी झाल्या शिळ्या
नजर ताजी शोधतो


एक ना तारा नभी
आणि चकवा भेटतो


सांगणे होते कुठे?
शब्द ओठी कांपतो


विकत मिळते सावली!
कोण झाडे लावतो?


सोडले ते घर तिने?
दार उघडे पाहतो!


_______________________________
जयन्ता५२


 

फार आता फार झाले (सुधारीत)

फार आता फार झाले
श्वास घेणे भार झाले

पेटता वणवे तमाचे
सूर्य सारे गार झाले

सज्जना त्या जलसमाधी
घोर पापी पार झाले

पाय धरती एकदा,मग
पाच वर्षे स्वार झाले

"शांतिवार्ता सफल झाल्या"
आणि त्यांचे वार झाले!

आमचे इतिहास अंती
'पानिपतची हार' झाले!

काय गल्ली,काय दिल्ली
नागवे बाजार झाले

--------------------------------------
जयन्त्ता५२

 

 

शोधतो आहे...

शोधतो आहे नवा मी थार आता!

बंद तुझिया घराचे दार आता!

 

वाढतो बाहेर थंडीचा कडाका...

एक ही चादर कशी पुरणार आता?

 

सांग आता मी कसा गे थंड राहू?

पेटतो बघ भोवती अंधार आता!

 

मार्ग सार्‍यांनीच अपुले शोधलेले...

कोण माझ्या मागुती येणार आता?

 

काय मध्ये अडथळा आला

ज्या मरणाला ...

आधी मजला एकटेच जे टाकुन गेले होते
नंतर माझी गझल पुन्हा ते घोकुन गेले होते

फक्त लपविले सत्य आणखी काही माझे शेर
नंतर आले सगळे आणिक ओकुन गेले होते

स्मशानावरी होती त्यांच्या एक मोकळी पाटी
नंतर माझे नाव तयावर ठोकुन गेले होते

पोथी घेऊन पुढ्यात जे जे संन्यासी म्हणविती
दुःखासोबत

रात्र आली....


रात्र आली चांदण्याना माळुनी
अन पुन्हा गेली जिवाला जाळुनी

देत आलो मी जगाला उत्तरे
प्रश्न माझा राहिला रेंगाळुनी

यामुळे ना मांडला प्रस्ताव मी
वाटले देशील तू फेटाळुनी

वर्षु दे पाऊस स्पर्शाचा तुझ्या
रात्र सारी जाउ दे गंधाळुनी

सौख्य ना आले कधी भेटावया
घेतले दुःखास मी कवटाळुनी

तू दग्याने प्राण माझा घेतला
मी दिला असता तुला ओवाळुनी

                            -वैभव देशमुख


मौन तुझे

बोल एकदा काहितरी रे

मौन तुझे घायाळ करी रे

कातर हळवी सांज गातसे

तरल विराणी दर्दभरी रे

श्रावणातही तळ्मळते मी

झेलुनिया अलवार सरी रे

जाणवते ती तुझी असोशी

इथे दाटतो श्वास उरी रे

देहच उरतो माझ्यापाशी

मन घुटमळते तुझ्या घरी रे

अंतरण्याने अंतर वाढे

मिटव दुरावा हा जहरी रे

पंच्प्राण

जपून चालले.

फितूर वाट होता, मी जपून चालले,
स्मरून न्यायनिष्ठा, मी जपून चालले.

इथे खुशाल घिरट्या घालतात लांडगे,
वस्तित माणसांच्या, मी जपून चालले.

जुनाच विस्तवाशी भावबंध आठवे,
फुलून वाट येता, मी जपून चालले.

कसून शोध हा भिंतीत चार चालतो,
चिणून श्वास माझा, मी जपून चालले.

कुठेच ना दिलासा पाहिजे तसा मला,
फकीर

फार आता फार झाले


फार आता फार झाले
श्वास घेणे भार झाले


पेटता वणवे तमाचे
सूर्य सारे गार झाले


सज्जना त्या जलसमाधी
घोर पापी पार झाले


पाय धरती एकदा,मग
पाच वर्षे स्वार झाले


"शांतिवार्ता सफल झाल्या"
आणि त्यांचे वार झाले!


आमचे इतिहास अंती
'पानपतची हार' झाले!


काय गल्ली,काय दिल्ली
नागवे बाजार झाले


------------------------------------------------------
(जयन्ता५२)

आताशा तो जरा निराळे वागत असतो

आताशा तो जरा निराळे वागत असतो

आताशा तो जरा निराळे वागत असतो
वारच नाही, शब्दांनाही पाळत असतो

त्याचीच करा चर्चा,  सांगा  त्याचे किस्से
तसाही तोच माझ्या मनात नांदत असतो

अनेकवेळा तीच कहाणी सांगत असतो
लकब आणि आवाज जरासा बदलत असतो

गळून पडती पिकली पाने जमिनीवरती
हा तुझा चेहराही का तसा