गझल

गझल

सल कशाचा आत कोठे खोल आहे


सल कशाचा आत कोठे खोल आहे
म्हणुन माझ्या हासण्याला ओल आहे

जर मला ना पाहिले मी अंतरंगी
तर पसारा साधनेचा फोल आहे

जग जसे जगतात सारे जीवजंतू !
पण अश्या जगण्यास काही मोल आहे?

कळत नव्हते का जगाचा खेळ झाला ?
मग निघाला तर्क "पृथ्वी गोल आहे"

मज म्हणाले काव्य माझ्या वेदनांचे
बघ तुझा सांभाळुनी मी तोल आहे
















छळतो अजूनही का

छळतो अजूनही का


पाऊस कालचा तो छळतो अजूनही का
जाळून काळजाला झरतो अजूनही का


ही रात्र चिंब ओली, आभाळ फाटलेले
मी कोरडा तरीही, उरतो अजूनही का


तन पावसात भिजले, मन आठवात न्हाले
देहात मात्र वणवा, जळतो अजूनही का


होती अशीच ओली, ती रात्र वेदनांची
उघडून त्याच जखमा, जगतो अजूनही का

शब्दाना अडवीत गेले.

ही वाट तुझ्या स्वप्नांची आशेने तुडवित गेले
अन रंग तुझ्या प्रीतीचे अंगावर उडवित गेले.

त्या कुठल्या पूजेसाठी आयुष्य उधळले मीही
ती नुसती पाषाणाची मी मूर्ती घडवित गेले.

वेदना कधी ना दिसली ना कधी उसासे कळले
हास्याच्या पडद्यामागे मी अश्रू दडवित गेले.

जे जाणवले तुज नाही ते शब्द कोरडे झाले
दु:खाच्या भरल्या

थाबं !

थाबं ! काही श्वास अजुन उरात बाकी  आहेत...
थाबं ! काही भास अजुन दुरात बाकी  आहेत...

 

जीवनाचे गीत जरिही सपंत आले असले तरिही,
ऍक!  काही बोल अजुन सुरात बाकी  आहेत...

 

उन्मळुन पडले वुक्षही सारे दुखा:च्या प्रवाहात या ,
बघ! काही मोजके लव्हाळे पुरात बाकी  आहेत...

 

सरत आले

काजळ

दुखा:चे अश्रु होते , अन् दुखा:चि ओजंळ होती ,
माझ्या एका हुद्याभोवती वेदनांची वर्दळ होती.

जाणिव होती  जखमांची, रक्ताळलेल्या पंखाची अन् ,
एक भरारी घेण्या आधी हवेत कितीक वादळ होती.

आता त्या कळी सारख आपल्यालाहि फुलयच आहे
प्रत्येक काट्याकाट्याला खोटी आशा केवळ होती.

सरा दोष होता केवळ माझ्या हातांच्या रेषांचा

भस्म


मिळाले घास आता मी गिळाया लागलो
तसा आगीत माझ्या मी जळाया लागलो!

मुलामा साखरेचा या जिभेला देउनी
कशी हांजी जगाची या कराया लागलो!

खरे स्वातंत्र्य माझे मी विकूनी टाकले
धन्याची चाकरी आता कराया लागलो!

गिळूनी स्वाभिमानाच्या जुन्या त्या कल्पना
अता मुर्दाड मीही वावराया लागलो!

तरी आतून आहे पेटतो ज्वालामुखी
तयामध्येच मीही भस्म व्हाया लागलो!

मनात येता विचार त्याचा उदास होते हसले तरी


मनात येता विचार त्याचा उदास होते हसले तरी

मनात येता विचार त्याचा उदास होते हसले तरी
अजून सलतो जुनाच काटा जरी कुठे ना फिरले तरी

कुठे छळाचा नसे पुरावा  असे समंजस घर देखणे
सकाळ होता सजून बसते कमी अधिक घडले तरी    

 विझेल  अग्नी  कधी बरे हा? इथे कुणाची  जळते चिता?
(अजून बाकी  कसा निखारा शहर कधीचे जळले

तटांसारखे..

चिरे लाव हे,.. तटांसारखे
शेर बांध अन,.. भटांसारखे!

अता सागरा, मिळून जावे,
जगावे किती,.. घटांसारखे?

रंग आपुले,..रंग विसरले?!
कसे भासती,.. छटांसारखे?

ह्वायचेय ना, तुला प्रवक्ता?
बोल बरे,.. पोपटांसारखे!

वाहतेस तू, समीप इतक्या;
तुला जाणतो,.. तटांसारखे!

कश्या वर्णु ह्या,.. ’कुंतल-क्रीडा’?
शब्द सांग ना,..’बटांसारखे’!

जगायचे ना?...लगेच लावा,
वृक्ष, निंब अन वटांसारखे!

भल्या माणसा, तुझे वागणे,
असो तिन्ही, मर्कटांसारखे!

शब्द, भाव हे, कसे ओळखू?
 तुझे प्रेमही,..नटांसारखे!
                  -मानस६





कितीदा

अता टाळतो मी, बोलणे कितीदा
कुणी ऐकते का ?..... सांगणे कितीदा

कुठे कोण जाणे, हरवले दिवस ते
मला पाहताना, लाजणे कितीदा

कळे ना कधी ही, वाट खिन्न झाली
इथे वेचलेले, चांदणे कितीदा

"कशी तू ?" तसा हा, होय प्रश्न सोपा
"अशी मी.... " तिचे ते, टोचणे कितीदा

उगा संशयाची

पाहतो श्वासात कोठे . .लागतो काही सुगावा

पाहतॊ श्वासात कोठे लागतो काही सुगावा
काल् तू होतीस ह्याचा शोधतो आहे पुरावा

अंगणापर्यंत माझ्या आसवांची रेष जाते
काय माझा चंद्र गेला ह्याच वाटेने असावा?

ही दुहेरी रीत एका माणसाला शोभते का ?
"जाउ दे ना" ही म्हणावे हात ही हाती धरावा

ती म्हणाली "माग ना रे. . . तू