गझल

गझल

नको ...

हृदयांस तुझ्या रे नको बदलवू आता
बदलून जगाला नको बिघडवू आता

प्रेमाचा साबण लावुन चमक जरा तू
बुडबुडेच नुसते नको पसरवू आता

मी पत्थर आहे, पत्थर म्हणून जगतो
शेंदूर लावुनी नकोस चिडवू आता

भूमीत उतरता सीता म्हणते, 'रामा ! -
नजरेतुन अपुल्या नको उतरवू आता'

उत्तरे जयाची तुलाच कापत गेली

बहरासंगे फुलणार्‍या सर्व फुलांची मी कोण लागते


मतला नाही, प्रकाशित करू नये
 
नकोच असतो  विचार ज्याचा, नकोच असते गाठभेठही
सुरू  असतात दिखाव्याला त्या शत्रूची  कशी स्वागते?

जमले सारे  आनंदाने म्हणजे  त्यांचे पटते ?..नाही...
त्यांचा शत्रू  एकच असतो  मग  प्रासंगिक सख्य जागते
 
झाड बहरता,पक्षी येती  ..पण वठलेले  झाड एकटे
लाभ संपता असेच घडते..  गर्दी  सगळी कशी पांगते ?...

टळले नाही कोणासुद्धा  शिखरावरून खाली येणे
तो झगमगाट आहे कळले, आता जपून मीच वागते 

वर्तुळाबाहेर माझ्या...

................................
वर्तुळाबाहेर माझ्या...
.................................

गायचे आहे; तरीही गात नाही मी !
तेवढा झंकारलेला आत नाही मी !

चालला खोलात माझा पाय; जाऊ द्या...
(का दिला तेव्हा कुणाला हात नाही मी ?)

मी न मृत्यू पावलो वा जन्मलो नाही...
अंतही नाही; तशी सुरुवात नाही मी !

ही चकाकी फार

पुनर्भेट

==================

चालला  तुझा  नवा  बनाव  आजही
राहिला  तसाच  का  स्वभाव  आजही?

फैर  झाडतेस  तू  सरावल्यापरी
तोकडाच  आमचा  बचाव  आजही..

मी  मनातल्या  मनात  बोललो  मला-
"केवढा  तरी  हिचा  प्रभाव  आजही !"

खेटुनी  बसायला  नकोच  एवढे,
पाहतो  दुरून  हा  जमाव  आजही

दोन  चुंबके  जणू  समोर  ठेवली
आपल्यामधे  असा  तणाव  आजही

या  घरात 

प्रवास



त्या झाडाने माझ्यावरती  बर्फ जरासा  असा लोटला
झरा वाहिला आशेचा अन् माझा सारा मूड बदलला

गाडीमधून जातांना मी  किती पाहिली फुले वेगळी..
त्यांची  नावे  कळण्याआधी  मार्ग कधीचा मागे पडला..

दोन दिशांना करून वाटा, आला रस्ता समोर जेव्हा
मार्ग कोणता घ्यावा आता मी वळणांच्या वाटामधला

मी वेलाची फांदी धरली पण हादरली मुळे कशाने
असे

तू दिलेल्या वेदना

तू दिलेल्या वेदना मी गात नाही
ती उधारी चुकविणे नशिबात नाही

पेलणे गांडीव तुजला शक्य नाही
मनगटी दुबळ्या तुझ्या ती बात नाही

भोगण्याचा शाप आहे नंदिनीला
आजही का आग प्रतिकारात नाही

जी नशा युद्धातल्या मरणात आहे
ती नशा लाचार या जगण्यात नाही

उंबर्‍याशी थांबले पाऊल माझे
स्वागताला आसवे दारात नाही

शहारा

पळणे इतके मुरून गेले
जरा थांबता... थकून गेले

गप्पा रंगत आल्या अन मी -
कशी अचानक उठून गेले?

मनात डोकावले; दचकले
किती किडे वळवळून गेले!

अजून फांदीवरी शहारा
कुणी इथे बागडून गेले

जमेलसे वाटलेच नव्हते
हळूहळू सावरून गेले...

कुणीच हल्ली मला म्हणेना
"काम तुझ्याविन अडून गेले"

आज दवाला गंध निराळा

काही स्वगते...

श्वापदांचे ना मुळी ते माणसांचे काम होते
सांडले मी रक्त भरले सोयर्‍यांनी जाम होते

जाळतांना काल काही मातलेल्या आठवांना
पेटलेल्या आसवांचे मोजले मी दाम होते

ना तिथे बाजार होता ना तिथे होती दलाली
भक्त होता 'तोच' त्याचा 'तोच' त्याचे धाम होते

शोधतो मी सांजवेळी हासर्‍या त्या माणसांना
गाव ज्यांचे बाटके

कैक मतले...

कैक मतले ...फक्त पडलेले!
काफिये...का सर्व अडलेले?!

रोज गगनाची मला पृच्छा.,
"काय तव पंखात दडलेले..?!"

सूर्य संध्येला असा भासे..,
की क्षितीजी रत्न जडलेले!

बांध तोरण जर्द पानांचे..,
रे वसंता...बहर झडलेले!

घुंगरू आले नशीबी अन,
पाय मग हे खूप रडलेले!

का अजूनी शिखर गवसेना..?
पाय तर वेगात पडलेले..?!

सांग ना दरिया मलाही ते..,
शिंपल्याच्या आत घडलेले!

           -मानस६

बातमी

दाटुनी आलो जरी नव्हतो मुळी बरसायला
उगवलो होतो तरी होतो कुठे बहरायला?

वेदनेची जाणुनी घ्यावी खुशाली एकदा
सोबती कोणीच नसता जीव हा रमवायला

शब्द माझे अधिक तुजला खातरीचे वाटले
त्याहुनी मी योग्य होतो भरवसा ठेवायला

मी कसा समजून घेऊ सारवासारव तुझी?
कोण आठवले तुला - इतके मला विसरायला?

लोक काठी