गझल

गझल

.....बरे दिसत नाही...!

...................................
.....बरे दिसत नाही...!
...................................

आनंद एकदा तरी उधळ दुःखा !
अश्रूंत हासणे जरा मिसळ दुःखा !

अंधार दाटतो कधी सुखांचाही...
येऊन तू पुढे दिवा उजळ दुःखा !

यादीत का तुझ्या कुणी स्वतः यावे ?
प्रत्येकजण म्हणे, ` मला वगळ दुःखा ! `

सदरा न `तो` तुझ्या मुळीच मापाचा...
होईल

भेट एकदा


विरहाचे जाळती निखारे... भेट एकदा
खुणावती रोजचे किनारे... भेट एकदा

धुंद पौर्णिमा, चंद्र चांदण्या, नटले अंबर 
नभातले चल, मोजू तारे... भेट एकदा

पहा ढगांची, दाटी झाली, गगनामध्ये
सोसाट्याचे, आले वारे... भेट एकदा

तुझी आठवण, देउन जाते, हळूच झोका
क्षणात फुलती, गोड शहारे... भेट एकदा

तुझ्याविना हे, असह्य जीवन, एकाकीपण
सांगितले तुज किती प्रकारे... भेट एकदा

किती

जगून काय साधले

 

जगून काय साधले विचारतोस जीवना
निदान तू तरी असे म्हणू नकोस जीवना

अजून वाटते नवल कसा असेल तो बहर
स्मरून ज्यास तू असा तरारतोस जीवना

मला नकोत हे तुझे जगावरील तोडगे
मला हवा तुझ्यावरी उपाय ठोस जीवना

अरे तिला विचार ना , तिनेच हात सोडले
पुन्हा पुन्हा मलाच का

तू परतून यावे

ती भल्या पहाटे कधी भेटली नाही
पण रात्र कधीही तिने टाळली नाही

'ती भेटे मज' हे पाहुन काही रडले
उरलेल्यांना ती तार पोचली नाही

ती टींगल होती नव्हते सांत्वन काही
मज कळण्याइतकी नशा साधली नाही

मी रक्त ओकले मनोरंजनासाठी
पण तहान त्यांची तरी भागली नाही

तू परतुन यावे घराकडे आईच्या

मी तरी देऊ किती आवाज आता..!

मी तरी देऊ किती आवाज आता..!
अंतरांचा येइना अंदाज आता..!

हा रिता प्याला तुझ्या हाती दिला मी.
जहर दे वा अमृता त्या पाज आता..!

यौवनाचे बाण काळ्याभोर नयनी.
तू सुद्धा झालीस तीरंदाज आता..!

प्रेम जे मुदलात होते, माफ केले
राहिले पण आठवांचे व्याज आता..!

पाहता तुज छाटले बाहूच दिसले.
ताज

तू गेल्यावर

           मी स्वप्न तुझे प्रेमाचे गुलजार उधळले होते!
           तू गेल्यावरती मग का हे रक्त उसळले होते?

            तू गेल्यावरती आले मज गंध प्रेमकुसुमांचे
            कळले न मला मी केव्हा गजरे चुरगळले होते!

            माझाच वेगळा रंग मी मिरवित होतो तेव्हा
            पण रंग तुझे अन माझे केव्हाच मिसळले होते

गरजत आहे, बरसत नाही

===============

गरजत  आहे, बरसत  नाही
गरजत  आहे! हरकत  नाही !!

मुबलक  चटके  बसले  आता
अनवट  वाटा  तुडवत  नाही

डचमळती  डोळ्यातून सगळ्या..
आठवणी  मी  हलवत  नाही

शुकशुक  झाली  ही  सवयीची,
मी  आताशा  दचकत  नाही

चघळत  बसतो  मेंदू  माझा
पटकन  सगळे  विसरत  नाही

अवघड  जागी  दुखणे  झाले..
सोसत  नाही; संपत  नाही

रोज 

हे तेवढे बरे झाले

हे तेवढे बरे झाले
शाप सारे खरे झाले

चंद्र असता रात्र काळी!
चांदणे घाबरे झाले

दोष माथी कुंपणाच्या
वादळाचे बरे झाले

खेळ होता जीवघेणा
मरणही साजरे झाले

बदलले काहीच नव्हते
ऋतू का हासरे झाले?

मोगरा बहरून आला
दारही लाजरे झाले

दूर

गेलात दूर तुम्ही आकाश शोधण्याला
आणीक दूर झाली भूमी अता तुम्हाला!

झालां गरूड तुम्ही घेऊन पंख त्याचे
घरट्यास आसर्याला जागा नसे तुम्हाला!

हनुमंत होउनीही रवि आणण्यास गेला
परतून ना कधीही प्रभु भेटला तुम्हाला!

विझलात आसमंती जळुनी उगा फुकाचे
ज्योतीसवे न केव्हा गणले कुणी तुम्हाला!

गेलात दूर तुम्ही अमुच्या मनातुनीही
इथल्या जगात आता थारा नसे तुम्हाला!

दुसरा कुणीच नाही....

पैशापरी जवळचा दुसरा कुणीच नाही
माणूस माणसाचा झाला कधीच नाही

गणगोत आप्त सारे जमले उगाच नाही
टाळूवरील लोणी उरले(पुरले) मुळीच नाही

शमले तसेच सारे देहातले निखारे
वणव्यास पावसाची नड भासलीच नाही

काळोख तुंबलेला दाही दिशात सारा
सूर्यात आग पुरती का पेटलीच नाही

डोळ्यात दाटलेले आभाळ मित्र झाले
पाऊस का सखा