गझल

गझल

मी फुलांची रास झालो


                            मी फुलांची रास झालो

                            मी फुलांची रास झालो,
                            श्रावणाचा मास झालो.

                           पाहुनी ’मधमस्त’ भृंगा,
                            यौवनाची आस झालो

                            जाहलो कंटाळवाणा
                          -बौद्धीकाचा तास झालो.

                           ने सवे वाऱ्या मला तू,
                          -मृत्तिकेचा वास झालो.

                          

पोहरा


पंखांचा अंदाज शेवटी खरा निघाला!
वाटत होते अंबर जे; पिंजरा निघाला!

उगीच ना मी थांबवले अर्ध्यातच गाणे
त्यावेळी सूर नेमका कापरा निघाला!

ज्याने सावरले तो नव्हता कुणीच माझा
ज्याने धीर खचवला तो सोयरा निघाला

असेलही तू फुलाप्रमाणे जपले त्याला...
नवल काय पण, काटा जर बोचरा निघाला

शांतच होते, ज्या पाण्याने

हे शहरच आता दिसते...

हे शहरच आता दिसते पैशात पूर्ण मुरलेले
पण सदरे सुखि व्यक्तींचे केव्हाच जीर्ण झालेले

 

ऋतु हा पानगळीचा, हे वृद्ध झाड वठलेले
त्यावरचे शेवटचेही नुकतेच पर्ण गळलेले

 

ही घरे येथली दिसती शुभ्रधवल रंगांची
परि अंतर्यामी त्यांच्या कितिक हे वर्ण दडलेले

 

वसती दुर्योधन येथे, कैक ते श्रेष्ठ अर्जुनही
अन

जगणे म्हणजे अवघड चळवळ


जगणे म्हणजे अवघड चळवळ
जीवनभरची तडफड तळमळ

पडणे उठणे कुणास चुकले
बघ झाडांची पडझड सळसळ

मी मेल्यावर तुला छळावी
या हृदयाची धडधड जळजळ

ज्यांना नाही काही धंदा
तयां आवडे धुळवड उठवळ

व्यर्थ न जावो कामी येवो
श्रीकांत तुझी बडबड कळकळ

...त्याचीच ओढा री पुन्हा!!

दाही दिशा हिंडून मी आलो तुझ्या दारी पुन्हा !
जाऊन मी जाऊ कुठे, तू सांग, माघारी पुन्हा ?

साऱ्याच पापांची अता शिक्षा मला घाऊक दे...
फेरी नको लादू नवी...लादू नको वारी पुन्हा !

ऐकून आधी घेतली...समजून घेऊ दे अता...
तू सांग संकोचाविना घडलीं  कथा सारी पुन्हा !

टीकेस घाबरतोस का

...जिथल्या तिथेच सारे !

येती विचार, जाती विचार...जिथल्या तिथेच सारे !
मेंदू बधीर, मन थंडगार...जिथल्या तिथेच सारे !

हेही करीन, तेही करीन, म्हणतो मनोमनी मी...
स्वप्नेच फक्त माझी हजार...जिथल्या तिथेच सारे !

मज डावलून,  संधी हसून गेली अनेक वेळा...
मीही कधीच नव्हतो तयार...जिथल्या तिथेच सारे !

होईन शूर, जाईन दूर, ठरले कितीकितीदा...
माझे मलाच

मनसुबे

गंध इथले वेगळे पण श्वास माझा तोच आहे
बंध हे रेशम जरी मी त्यात गुदमरलोच आहे

नेमकेपण येत आहे आपल्या नात्यात आता 
बोलतो केव्हातरी अन त्यातसुद्धा खोच आहे

मी किती हुसकावले, दुर्लक्ष केले, टाळलेही
सारखा दारापुढे तो पारवा घुमतोच आहे

ताठ होते सर्व येताना मनाच्या मद्यशाळी
हाय आता मनसुबा प्रत्येक डळमळतोच

एकपात्री

ते कधी येणार नव्हते ही मला होतीच खात्री
मी सुरू केला अखेरी खेळ माझा एकपात्री

ठेवतो आहे स्वतःच्या जो घराचे नाव 'आई'
भोगले दारिद्र्य त्याची आश्रमला जन्मदात्री

आजही लोकात जेथे जात धर्माहून भांडण,
गाव ते बघुनी परतला फक्त वेशीतून यात्री

त्याच संस्था फक्त येथे सारख्या वादात दिसती,
लावती उद्घाटनाला हे

अंतरास जाळते व्यथा

अंतरास जाळते व्यथा मनातली
सांगतो कथा प्रिये तुला मनातली

पाहुनी कुणास रोज जीव  धडधडे
ही कुणा कळेल का नशा मनातली

शोधतो चहूकडे मी सारखे तुला
सांग ना सुखा तुझी दिशा मनातली

सागरा समान दु:ख काळजात या
ही  न  पेलवे मला कळा मनातली

आणलीत माणसे जगात तू तुझ्या
तार मात्र तोडली  मना  -मनातली
                                 
                             ----   स्नेहदर्शन {धुळे}{९२२६८६७१५७}

 

 

 

खर्डेघाशी

दिवसांवर दिवसांच्या राशी
जीवन म्हणजे खर्डेघाशी


फोडासम ज़पलेले शैशव
खपली धरते तळहाताशी


तुझ्या बटांशी खेळुन जावे,
वार्‍याची इतकी बदमाशी?


बांधू जेथे घरटे आपण
तिथेच मथुरा,तिथेच काशी


भुकेल्यांस भाकरी नसे, अन्
खाणारे खाऊन उपाशी


तुझ्याविना जगण्याची शिक्षा
हीच का मरेस्तोवर फाशी?


जरी वादळे येती ज़ाती
लाटांना भिडतात खलाशी