गझल

गझल

बाग

प्रेमात आग आहे.
जळणेच भाग आहे.

शापीत चंद्र झाला...
इवलाच डाग आहे

मागा खुशाल गर्दी;
शांती महाग आहे.

स्वप्नास खूप चिंता...
झोपेस जाग आहे.

नाही भिती विषाची
पाळीव नाग आहे.

झालेत खून येथे;
गुपचूप बाग आहे!

                                        -अभिशेक उदावंत
                                 संवेदना रायटर्स कंम्बाईन, अकोला.
                                 मो. नं. ९९२२६४६०४४

तरी हात हाती हवासा तुझा...

कुठे रहिला अर्थ श्वासा तुझा....
अरे... होत आहे उसासा तुझा....

खरे.. व्यर्थ वाटेल खोटे पुन्हा..
पुरे.. खूप झाला खुलासा तुझा..

चुकीची तुला भेटली बातमी.!!!
तरी छान होता.. दिलासा तुझा..

कुठे पाळला आजवर शब्द तू..
कसाकाय ठेवू भरोसा तुझा...

जरी ओळखीही नसे आपली..
तरी हात हाती हवासा तुझा...

अमित वाघ.
''गुरुमंदिर'', सुधीर कॉलनी. अकोला- ४४४००१.
मो. क्र. ९९२१६११६११; ९८५०२३९८८२.
www.gazalnavihotanna.blogspot.com

आपण दोघे

 


कधी संयमी, कधी अनावर आपण दोघे;
हो-नाहीच्या उंबरठ्यावर आपण दोघे.


क्षुल्लक-क्षुल्लक कारणांवरुन भांडण करतो;
स्वत:च हसतो नंतर त्यावर आपण दोघे.


बोलायाचे तेच बोलतो नेमके तरी,
उगीच करतो आवर-सावर आपण दोघे.


कशास येतो अहंकार हा आपल्यामधे;
शोधू उत्तर ह्या प्रश्नावर आपण दोघे.


जरी माहिती कहाणीस ह्या शेवट नाही;
कधी न

ययाती

बांधूनही मनोरे ,किर्ती  कथेत नाही.....
इतिहास सांगतो हा ,स्वप्नात नेत नाही.....

छातीत वेदनांचे, भरपूर पीक येते
डोळ्यात आसवांचा ,पाऊस येत नाही

तारुण्य मागणारा ,शापीत मी ययाती
माझीच देवयानी ,माझ्या कवेत नाही

नशिबा विचार कसला, करतोस नेहमी तू
झोळीत दान माझ्या ,काहीच येत नाही

उपवास देवतांचे, मी काल खूप केले
कुठ्लाच

मारवाही शेवटी...

मारवाही... शेवटी... मंदावला
भैरवीचा सूर... आहे लागला

मैफिलीचा ताल गडबडला असा
केरवा, झपताल.. एकच वाटला

कोणती बंदीश गाते...? जिंदगी
षड्ज मज अद्याप नाही गावला

जीवना हा राग आहे कोणता ?
वेदना कवळून जो.. मी गायला

बोल ह्रदयीचा तुझ्या मी ऐकला
जो समेवर... मंद थोडा वाजला

मी प्रयासाने खुलवला जोगिया
पण

परिस्थितीच्या उन्हात...

परिस्थितीच्या उन्हात हे आयुष्य करपले माझे
कर्तव्याच्या जात्याने... जगणेच भरडले माझे

वयाअगोदर... चेहर्‍याचे वयमान.. वाढले आहे
शोधामध्ये कसल्याशा... बालपण हरवले माझे

"स्वत:स जप तू" असे आजवर कुणी बोलले नव्हते
तुझे 'शब्द' ऐकून... ह्रदय.. अश्रूत तरळले माझे

जिद्द अशी की... आकाशाला कवेत घेइन माझ्या
घाव सोसुनी... ध्येय असे मजबूत बनवले माझे

उलट्या-सुलट्या खूप

मला ठावुक की...

मला ठावुक की... क्षणभर तिथे तू थांबली होती
जरा वळताच मी मागे, कशी तू... धावली होती

तुझ्या डोळ्यातली तगमग नि सोबत बोलणे हळवे
मनाची चलबिचल सारी तुझी... मी जाणली होती

जरा आठव पुन्हा राणी फिरुन ती भेट अवचितशी
तशी ती वेळ अजब नि तू किती.. भांबावली होती

मला स्मरते अजुन

काटाकाटी श्वासांचीही..

अवतीभवती थकलेल्यांना वाचत जातो
शब्दांना तेव्हाही वाटे, जाचत जातो

प्रत्येकाच्या अग्रावरती मीपण असते
'मी'च तरीही प्रत्येकाला डाचत जातो

जीवन म्हणजे काटाकाटी श्वासांचीही,
छातीलाही मांझा त्याचा काचत जातो

चुकवत गेलेला मृत्यूही अनुशेषासम
आयुष्याच्या काठावरती साचत जातो

मरगळलेल्या निमिषांनाही पडताळाया,
मोर उगाचच उत्साहाचा नाचत जातो

फाटत जाणारी रक्ताची नातीगोती
कोणी रक्ताच्या धाग्यांनी

आई दे..

आई दे..,वा ... आया दे
काहीही कर, माया दे


दे द्यायाची आहे तर,
विषयावाचुन काया दे


दे प्रेमाला जीवन दे
जावू दे ते वाया...दे


कानी दुष्प्रवृत्तीच्या,
सत्वृत्तीचा फाया दे


रेड्यांना दे वेद तरी,..
मजला गाणी गाया दे


सूर्यालाही तेज मिळो,
बाकीच्यांना छाया दे


- प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, उदगीर

खरेच राणी...

खरेच राणी... कधीपासुनी गझल एकही सुचली नाही
मनातली ही माझी घुसमट तुला अजुनही कळली नाही

किती खुणावू तुला खुणेने... कुठली ही तुज खुण कळेना
किलकिलत्या पापण्यात तुझिया अजुन चांदणी हसली नाही

क्षणभरही मी, तुझ्या आठवांना या... दूर न करतो केव्हा
तुझी आठवण हलके-हलके फुलली पण... मोहरली नाही

अताशा कुठे... स्वप्नामध्ये