गझल

गझल

विषारी केव्हढे वातावरण आहे

विषारी केव्हढे वातावरण आहे
कसा फुत्कारतो कण आणि कण आहे

तुझे हे शहर तर फिरते मसण आहे
मरणघाईत का प्रत्येक जण आहे

कुणी इथली हवा निर्धोक नासवली
कुणी केले नभाचे अपहरण आहे

जणू वस्तीत लखलखत्या अभावांच्या
सनातन चालला अंधारसण आहे

कधी बळकावणे जमलेच नाही तर
इथे विधिवत सुरू सीताहरण आहे

"दारू"

कातरवेळी दु:ख दाटते...''तिकडे'' नकळत जातो
नुसती दारु घसा जाळते....अश्रू मिसळत जातो

तुझ्या नकाराची दाहकता तीव्र एवढी आहे
मेण जळावे तसाच हल्ली मीही वितळत जातो

सुगंध येतो जखमांना हल्लीहल्लीच कळाले
मी गेल्यावर दुनिया म्हणते...कोण दरवळत जातो?

फुटेल हा कातळसुद्धा या वेड्या आशेवरती
ओघळणारा होतो पण मुद्दाम कोसळत जातो

किती जरी तू

किती?

मी करावा निवाडा जगाचा किती ?
कौल घ्यावा स्वतःच्या मनाचा किती ?

केशरी सांजवेळी, सकाळी निळे
माग काढू अशा अंबराचा किती ?

प्रेम सर्वांवरी खूप केले तरी
शेवटी राहिलो मी कुणाचा किती ?

ऐकली मी तुझ्या अंतरीची व्यथा
फायदा त्यात माझ्या मनाचा किती ?

हे तपासायचा लागला छंद की,
दोष

बोचरे वारे

बेबंद फुलताना नवी कलमे इथे
धरतील कुठवर तग जुनी झाडे इथे

कुठल्याच साच्यातून मी घडलो कुठे
काहीच नाही व्हायचे माझे इथे

कपड्यांकडे पाहून हळहळतोस का
व्यक्तीत्व बघ उसवून गेलेले इथे

तू ये तुझी इच्छा कधी झालीच तर
आहे सुरू हा याग नेमाने इथे

आल्हाद नाही देत ही झुळझुळ हवा
धाडा

हाक

कविवर्य सुरेश भट यांचा आज (14 मार्च) स्मृतिदिन.
त्यांना विनम्र श्रद्धांजली.
...........................................................
हाक
...........................................................

दालनात दालने नि दालनात दालने
एक देह...त्यात ही मनातली किती मने !

बासरी तुझी घुमे चहूकडे अजूनही...
राहिलीत ही तुझी इथे चुकून स्पंदने !

मोकळेपणातही जरा न मोकळेपणा...
घातली कुणावरी जरी कुणी न बंधने

ये निदान

पाहिले चालून त्याच्या सोबतीने

पाहिले चालून त्याच्या सोबतीने
मात्र केला घात काळाच्या गतीने

प्रेम ताटातूट वा खोटा अबोला
काय जे होईल...... होवो संमतीने

टाळतो सल्ले स्वतःचे मीच आता
बोल माझ्याशी जरा माझ्यावतीने

वाटले नव्हते असे उलटेल सारे
मी तुला जे जे म्हणालो गंमतीने

भेटवस्तू तर परत केल्यास सार्‍या
काळही देशील ना तो फुरसतीने

-'बेफिकीर'!

आकडेवारी

पाल्हाळ तू लावू नको, दे आकडेवारी मला
जाणीव होते नेमकी संख्येतुनी सारी मला

जेरीस आलो केवढा पुरवून सारे हट्ट मी
केलेस या प्रेमामधे तू कर्जबाजारी मला

झाले तुलाही परवडेनासे भेटणे बागेमधे
दिसते महागाईच माझ्याही घरीदारी मला

काही नको तू ऐकवू डोक्यास देते ताप जे
- ऐकव गड्या कविता जरा हृदयात

लागला गळपफास तेव्हा तरतरी श्वासात आली!

गझल
लागला गळपफास तेव्हा तरतरी श्वासात आली!
पार मेली भूक तेव्हा भाकरी हातात आली!!

पोटपाण्याचा निघाला मामला अन् वाकलो मी;
ताठ केली मान तेव्हा नोकरी धोक्यात आली!

वाटल्या लाटा दयाळू, अन् किनाराही कृपाळू;
लागला पत्ता न केव्हा जिंदगी गोत्यात आली!

कोण जाणे हे कधीचे नाचते तारुण्य माझे?
समजण्या आधीच काही

जितके जमते..

=======================

संवादाचा ढळतो आहे तोल, तरीही-
जितके जमते, तू माझ्याशी बोल तरीही

तुझ्या कृपेची वर्षा झाली.. निरभ्र झाले
अजून शिल्लक भिंतीमधली ओल तरीही

काठावरती बसणे बहुधा रम्य असावे
आपण जावे जमते तितके खोल तरीही

भेटत नाही मित्र अचानक रस्त्यावरती
म्हणावयाला पृथ्वी असते गोल, तरीही !

आपण आता येथे असणे सुंदर

पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते

पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते

धमासान आधी महायुद्ध होते
पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते

प्रणयवासनेला सिमा ना वयाची
न तो वृद्ध होतो, न ती वृद्ध होते

जुने देत जावे, नवे घेत यावे
दिल्याघेतल्याने मती शुद्ध होते

किती साचुदे गाळ-कचरा तळाशी
तरी धार नाहीच अवरुद्ध होते

जसा बाज गझलेस येतो मराठी
तशी मायबोलीच