गझल

गझल

भान माझे... (अजब)

हरवले आहे कधीचे भान माझे
चालले आहे तरी पण छान माझे!...

छे! कुठे चाहूल; तो तर भास असतो
ऐकण्या टवकारतो मी कान माझे...

राहती माझे रिकामे हात आता
परत पण मागू कुणाला दान माझे?...

चेहरा मी शक्य तितका बदलतो अन्
आरसा हसतो 'निरखुनी' ध्यान माझे!...

जिंकलो असतो लढाई पण अखेरी

कसे जगावे...?

'कसे जगावे ...?..' प्रश्न एवढा खटकत राही
शरीर माझे, आत्मा माझा झटकत राही

उभा इथे मी आयुष्याच्या तीरावरती..
क्षणाक्षणाची वाळू खाली सटकत राही

शरीर गेले, तरी न त्याची गाथा सरली
जगास अवघ्या सांगत सत्ये भटकत राही

उगाच माझ्या आयुष्याची क्षेमखुशाली...
विचारून तो येता - जाता हटकत राही..!

कुठे कुणाला दिसला

एक वेडी वेदनेची जात आहे.


एक वेडी वेदनेची जात आहे
त्यात आता श्रावणाची रात आहे

चांदण्याचा नूर ह्या डोळ्यात माझ्या,
आज हाती चांदण्याचा हात आहे

येउनी ती बैसली माझ्या समोरी,
काय माझ्या मैफिलीची बात आहे!

छंद वेड्या राधिकेचा काय सांगू,
झोपताना बासरी हातात आहे!

आज साऱ्या पाकळ्या ह्या ध्वस्त कैश्या?
-काय माळ्यानेच केला घात आहे?

..आता नको !

...आता नको !

जिवाचा कुणी यार आता नको !
कुणाचाच आधार आता नको !

नका  आत घेऊ कुणीही  मला...
खुले एकही दार आता नको !

रुकारात होकार देशील का ?
नकारात होकार आता नको !

मला प्यार आहेत काटेकुटे...
फुलांचा मला हार आता नको !

स्वतःचीच विक्री जिथे व्हायची....
असा

...कवितेने दिले !

...कवितेने दिले !

विस्तवाचे दान कवितेने दिले !
चांदणेही छान कवितेने दिले !

जन्म हा निष्पर्ण झाडासारखा...
एक हिरवे पान कवितेने दिले !

व्यक्त हो चौफेर, डेरेदार तू...
मोकळे हे रान कवितेने दिले !

त्याच त्या गोष्टी जुन्या विसरून जा...
हे नवे आव्हान कवितेने दिले !

वेदना, दुःखे, व्यथा अन्

घावामागून घाव घातले त्याबद्दल आभार..

हिंदीतील एक नामवंत कवी श्री.कुँवर बेचैन ह्यांची एक गझल अलिकडे कविताकोश ह्या वेब-साईटवर वाचण्यात आली.... त्या गझलेतील 'शुक्रिया' हे रदीफ, गझलेतील आशय,शैली, आणि मुख्य म्हणजे साधी भाषा ह्यामुळे ती गझल मनाला भावली..त्यातील काही निवडक शेरांचा भावानुवाद करायचा प्रयत्न केलाय..

 घावामागून घाव घातले, त्याबद्दल आभार

घावामागून घाव घातले, त्याबद्दल आभार.
पाषाणाला

मंतरलेल्या सायंकाळी

मंतरलेल्या सायंकाळी, आठवणींचा भर काहीसा..
अंतर काहीसे जड होते...कातर होतो स्वर काहीसा..

सांज अनावर कोसळताना, व्याकुळलेले मनही दाटे...
दूर ढगावर अंधाराचा, अंथरलेला थर काहीसा..

रोज पहाटे झेलत असते, कोसळणार्‍या दवबिंदूंना...
..आज कळेना स्पर्शानेही, का थरकापे कर काहीसा...!

ही गगनाची तेजसमाया...वा क्षितिजाचा सोनकिनारा...
...की, हिरव्या शालूचा माती मिरवत आहे 'जर' काहीसा

आजही अप्रूप वाटे


आजही अप्रूप वाटे कवडश्यांचे ...!
- अन उन्हाशी खेळणार्‍या आरश्यांचे...!


पाप केले मागच्या काही पिढ्यांनी...
भोग प्रायश्चित्त आता वारश्यांचे...


नावही ज्यांचे कुणाला ज्ञात नाही,
कोण कौतुक रोज त्यांच्या बारश्यांचे...!


कोरडा दुष्काळ आहे...समजतो मी...
...सूरही गेले कुठे पण पावश्यांचे...?


ठेवला नाही कुणाचा भरवसा मी
..एरवीही काय होते, भरवश्यांचे...?


- प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, उदगीर


दुःखाने कुठल्या समुद्र इतका हेलावतो सारखा ?

दुःखाने कुठल्या समुद्र इतका हेलावतो सारखा ?
अश्रू का इतके पितो, खवळतो, खारावतो सारखा?

केव्हाचा खटल्यापरी गुदरतो आहेस तू जीवना ?
फिर्याद्यासम श्वासश्वास फिरतो, ठोठावतो सारखा

आहे कोण जगात मित्र अथवा वैरी मनासारखा ?
कोणी का इतका कुणास जपतो वा जाचतो सारखा ?

रक्ताने अमुच्या भिजून क्षितिजे तेजाळली येथली
दर्पाने

वेळी अवेळी



तू नको येऊ अता वेळी अवेळी
तोल जातो,भेटता वेळी अवेळी


हा खुळा भ्रमर विचारी त्या कळ्यांना!
"का मला बोलावता वेळी अवेळी?"


योजना आहे तुला छेडावयाची
आड येते सभ्यता वेळी अवेळी

सांग मी येऊ कसा स्वप्नात,सखये
हे असे तू जागता वेळी अवेळी

तू कसे जाणून घेशी नेमके,ते
जे न मज ये सांगता वेळी अवेळी


जयन्ता५२