गझल

गझल

कुठे म्हणालो?... (अजब)



कुठे म्हणालो मला चांदणे आवडते?
खरे तर मला तुझेच हसणे आवडते...


नकोस सांगू मनातले तू मला तुझ्या
मला तुझा चेहरा वाचणे आवडते...


तुझा हट्ट तू सोडणार नाहीस कधी
मलाही तुझे रुसून बसणे आवडते...


तू नसताना पावसात मी भिजू कसा?
आठवणींच्या सरींत भिजणे आवडते...


एकटाच मी गातो आहे 'अजब' गजल
असे सुरांतच तुला शोधणे आवडते...


...कोण मी तुझा ?


कोण मी तुझा ?

मी तसा तुझा कुणी नसूनही...कोण मी तुझा ?
हे कळेचना मला अजूनही...कोण मी तुझा !

भेटणे किती नि बोलणे किती रोज रोज हे...
रोज रोज हे असे असूनही...कोण मी तुझा ?

कोण मी तुझा...? उगाच मोकळे बोलतेस का ?
पाहतेस का अशी हसूनही...कोण मी तुझा

फुलांना जर असे

फुलांना जर असे आहेच कोमेजायचे
कशाला जीव लावुन ताटवे फुलवायचे

कशासाठी  पसारा मांडला तू  एवढा?
तुला आहेत सारे सूर्य जर वि़झवायचे

पुन्हा  भिजलो न मी , भिजलो मिळुन दोघे जसे
विसरले मेघही नंतर  तसे बरसायचे

विचारे सारखी येऊन आठवणीत ती
'किती वेळा ठरवले तू मला विसरायचे'

नको पाहू अशी तू एकटक

दाखला


हा दाखला तो दाखला
"तू जन्मला, तू संपला"

असणे तुझे, नसणे तुझे
दो कागदांचा मामला

करता उद्याचे बेत मी
तो काळ छद्मी हासला!


धावा कधी केला न मी
मग तो मला का पावला?

माझ्यात जो होता म्हणे
आत्मा मला ना गावला


जन्मेन मी अजुनी पुन्हा
हा मोक्ष मज ना भावला


 


(जयन्ता५२)



 


...नाही आज सुचत काही !

...नाही आज सुचत काही !

झाले आहे काय कळेना...नाही आज सुचत काही !
पाणी डोळ्यांतील खळेना...नाही आज सुचत काही !

वाटेना वाईट कशाचे..  होई दुःख  न कसलेही ...
थोडेही का रक्त जळेना...नाही आज सुचत काही !

आयुष्याने रोज छळावे...याची खूप सवय होती...
तेही बेटे आज छळेना...नाही आज सुचत काही !!

दारोदारी

आत्मसात

'ना-ना' खुले म्हणालो, 'हो-हो' मनात केले
सारे तुझे बहाणे मी आत्मसात केले!

फसलो जगामुळे पण हसलो जगापुढे मी
का प्रेम ह्या जगावर मी तहहयात केले?

भीती जरा न उरली आता मला कुणाची
हेतू मनातले मी सर्वांस ज्ञात केले...

होतो पुढे निघालो घेऊन साथ ज्यांना
त्यांनीच नेमके का विश्वासघात केले?

देऊ कसा

साळसूद

पूल बांधतो जरी
वाढतेच का दरी?

भूक ही शिळीच अन
ही शिळीच भाकरी!

राग फार साचला,
काढला तुझ्यावरी

देतसे कधी हरी
काय खाटल्यावरी?

आलबेल या इथे
कत्तली तिथे जरी!

साळसूद ठेव तू
भाव चेहर्‍यावरी!

प्रश्न हेच जर तुझे -
व्यर्थ जिंदगी खरी!

बोलताना तोल गेला...

बोलताना तोल गेला

बोलताना तोल गेला,
घाव झाला खोल गेला

कालचा उपदेश माझा,
काय मित्रा फोल गेला?

पैंजणांना चेतवाया,
ढोलकीचा बोल गेला

अश्रू सांगे वाहताना,
-"जन्म कवडी-मोल गेला".

नेत्र-बाणा , सांग ना रे,
येव्हढा का खोल गेला?

वाढला अंकुर पण का,
सोडुनी ती ओल गेला?

काय रामाच्या कथेतुन,
जानकीचा रोल गेला?

                -मानस६

...दिवेलागणीच्या वेळी !


...दिवेलागणीच्या वेळी !

नको तेच ते का स्मरते...दिवेलागणीच्या वेळी !
तुझ्या आठवांना भरते...दिवेलागणीच्या वेळी !

जणू होत आहे चकवा...फिरे काळ एका जागी...
पुढे वेळ कोठे सरते...दिवेलागणीच्या वेळी ?

- पडू लागता कायमचा जसा गाव मागे मागे...
कुणी पोर डोळे भरते...दिवेलागणीच्या वेळी !

मला एकट्याला बघुनी म्हणे चांदणी एकाकी...
तुझा हात

कंठशोष

जगती चिवट अजूनी, का हाच दोष त्यांचा?
जाळून बाल्य करता का रक्तशोष त्यांचा?

का व्यर्थ फडफडावे? चिमटीत गुदमरावे?
सुरवंट रेंगणारे विणतीच कोष त्यांचा!

कळती तुम्हास सार्‍या खाणाखुणा इशारे
विरतो कड्याकपारी का कंठशोष त्यांचा?

समजून कोण घेते कोणास आज येथे
माझ्यावरी तरीही आहेच रोष त्यांचा!

सवयीनुसार त्यांनी संकल्प सोडले अन
सवयीनुसार चालू हा मंत्रघोष त्यांचा!