जगण्याला काय हवे..?
जगण्याला काय हवे?
आवाहन, नित्य नवे!
बॅंकांना दीर्घ सुट्या,
व्यापारी उर बडवे!
मदतीचा हात कुठे ?
गेले लांबून थवे !
शाखा अन्यत्र नसे,
एकले तरु हिरवे!
छत्री निसटून जाय,
-आणी ती आज सवे!
अमुच्या नशिबात हेच,
"ये, चल घे, गिळ, सटवे!"
-मानस६
गझल
गझल
जगण्याला काय हवे..?
...पुढे मी गेलो !
...पुढे मी गेलो !
हे रान जरी घनदाट...पुढे मी गेलो !
काढून स्वतःची वाट...पुढे मी गेलो !
पायात जरी दररोज निराळी बेडी...
सोडून मला मोकाट..पुढे मी गेलो !
चौफेर पहारे, गस्त नि नाकेबंदी....
त्यातूनच बिनबोभाट पुढे मी गेलो !
फिरणार तसा नव्हतोच कधी माघारी...
होऊन पुरी घबराट...पुढे मी गेलो !
आता
जगणे असते... (अजब)
जगणे असते अपुले आपण जगू तसे
भोवतालचे दिसते आपण बघू तसे...स्वप्ने, कविता, आठवणी अन रोजनिशी
खजिने वाढत जाती आपण भरू तसे...येता-जाता नकळत गाणे गुणगुणतो
गाणे मनात असते आपण म्हणू तसे...पाउस आहे खुणावतो बघ केव्हाचा!
चल ये, आपण पुन्हा एकदा भिजू 'तसे'...नको वसंता, कसली सक्ती झाडांना;
'अजब'
का?
मी देह जाळला रे
मी शब्द पाळला रे
फुलली फुले किती,पण
गजरा न माळला रे
केल्या खुणा जगाने
मी मोह टाळला रे
मी नाव कागदी अन्
दर्या उफाळला रे
सजले तुझ्याच साठी
का तू न भाळला रे?
(जयन्ता५२)
...सारेच विसरू दे मला !
...सारेच विसरू दे मला !
बडवे, विठोबा, पंढरी...सारेच विसरू दे मला !
तेथे न माझी पायरी... ! सारेच विसरू दे मला !
काही तरी झंकारले...कोणी तरी हुंकारले...
आता सुनेपण अंतरी...सारेच विसरू दे मला !
ती रातराणी, चांदवा... गंधाळलेला गारवा...
ती पौर्णिमा जादूभरी...सारेच विसरू दे मला !
ऱडलीस तू माझ्यासवे...पुसलीस माझी
फार मी कुठे...
फार मी कुठे...
फार मी कुठे गावत नाही
बातमीतही मावत नाही
दोष नेमका शोधत असतो...!
आरसा मला भावत नाही
भोग लाभले जे नशिबाने
बोल त्यांस मी लावत नाही
ओरबाडतो जो नजरेने
रूप त्यास मी दावत नाही
थंड येथले रक्त कसे हे...!
काळजातही धावत नाही..!
दूध पाजले ज्या सापाला,
काय सांगता
भयंकर
शब्दांमधली आग भयंकर...!
मौनमधला राग भयंकर...!
इच्छा झरते तप्त हलाहल,
गात्री फिरतो नाग भयंकर...!
देहापरते मोहक लाघव..
शीलावरचा डाग भयंकर...!
ंमृत्यूही यावाच अचानक,
...तो शेवटचा भाग भयंकर...!
दूरावरुनी दरवळ घ्यावा,
स्पर्शाची ती बाग भयंकर...!
अंधांच्या नशिबास कशी ही..,
स्वप्नाहुनही जाग भयंकर...!
-प्रा. डॉ.संतोष कुलकर्णी, उदगीर
लोक
लोक..
का आता हे आले लोक..?
आले- गेले, - साले लोक...
ह्या वाटेने गेले कोण..?
..सैरावैरा झाले लोक..!
प्रत्येकाला आली धार..
..झाले बरची, भाले लोक
ज्या लोकांनी केला घात,
माझे त्यांत निघाले लोक
ज्याचा त्याचा एकच ध्यास..
..पैसा..धंदेवाले लोक
घेवुनिया तेजाचे ढोंग
अंधारात बुडाले लोक
..सॄष्टी की डोळ्यांचा पूर..?
अन अश्रूंनी
..पुन्हा सांग ना!
कसे भेटले, युग-तॄष्णा नि अधीर पाणी- पुन्हा सांग ना
खूप भावली, हॄदयाला ही प्रेम-कहाणी- पुन्हा सांग ना
कुठून होत्या, सोबत छाया, विरहाच्या ते, दिसले नाही;
परतीच्या वाटेवर होते नयनी पाणी- पुन्हा सांग ना
हवा ही खबर,आणत राहो; ऐकत राहो, मी ही आणिक,
सरेल आता, पानगळीची ऋतु-विराणी- पुन्हा
पोचुनी दारी तुझ्या
पोचुनी दारी तुझ्या मी परत जायचे
मी असे आता कितीदा करत जायचे?
रेखतो चित्रे अनोखी तो सभोवती
त्यांत केवळ रंग आपण भरत जायचे...
किर्र काळोखात बुडल्या दशदिशा, तरी
स्वप्न किरणांचे उराशी धरत जायचे!
(शुष्क पर्णासारखा गेलो गळून; पण -
सांग कुठवर जीवनी मी तरत जायचे?)
रोज मृत्यूच्या दिशेने वाटचाल; पण