गझल

गझल

...विचार एखादा


असा अचानक समोर येतो विचार एखादा
पुढ्यात यावा जसा जुना सावकार एखादा
 
किती किती जायचे तडे बंद तावदानांना
कुठूनसा शब्द यायचा टोकदार एखादा
 
कधी कधी वाजतात स्फोटांपरी फटाकेही
असेल का त्यातलाच हाही प्रकार एखादा
 
अजूनही सांज व्हायला वेळ केवढा आहे
मिळेल का चेहरा दिवसभर उधार एखादा
 

त्या कळीची रानवेड्या पाखराशी भेट झाली

  त्या कळीची रानवेड्या पाखराशी भेट झाली
का हव्याशा  वाटणार्‍या आठवांना टाळले मी
फक्त  आहे तीच सोबत हेच होते मानले मी

....................................................
'फोन नंबर दे म्हणाला,' तो मलाही शेवटी मग-
भेटण्याचे , लाजण्याचे  खूप इमले  बांधले मी

त्या कळीची रानवेड्या पाखराशी भेट झाली
अन्  फुलाला जागण्याचे  भान आले ..शोधले मी

पसारा !



पसारा !

कधीच हा जन्म खाक सारा झाला !
तरी कुठे गार हा निखारा झाला ?

नकोस काढू पुन्हा फुलांच्या गोष्टी
पहा, पुन्हा हा उदास वारा झाला !

कुणास आता तुझी न वाटे भीती...
तुझा कशाने कमी दरारा झाला ?

समीप येऊ न दें कुण्या लाटेला...
असा कसा कोरडा किनारा

कुठेच आता सवाल नाही

कुठेच आता सवाल नाही
कुठेच आता बवाल नाही

कशास पळता आता वळुनी
हातात माझ्या मशाल नाही

मला समजले फकीर त्यांनी
असो भिकारी, मवाळ नाही

तुझ्या घराशी मरेन म्हणतो
दुजा बहाणा जहाल नाही

तुझ्या सुरांशी कधीच नव्हतो
उगाच गाणे रटाळ नाही

उगाच भिंती खचुन गेल्या
असा कुठेही महाल नाही

मनात गातो तुझ्या कविता
उगीच कोठे, खुशाल नाही

संतोष (कवितेतला)

सवे या..

सवे या चांदण्यांच्या मी कशाला जागलो होतो ?
फुलांशी मी कुणासाठी, कशाला बोललो होतो ?

निरोपाच्या क्षणी होता तुझा मी हात धरलेला
तसा अगदीच नाही पण जरा ओलावलो होतो

असे प्रत्येक वेळेला मला वाटून गेले की,
जसे वागू नये कोणी, तसा मी वागलो होतो

पुढे वेगात जाणे हे मलाही शक्य होते

उस्ताद

उस्ताद

द्यायची राहून गेली दाद तेव्हा
घेतला होता कुठे आस्वाद तेव्हा!

तू जराही ऐकले नाहीस माझे
रंगली होतीस तू की वाद तेव्हा?

उजळलेल्या झोपड्यांची रोषणाई
पेटले होते कुठे प्रासाद तेव्हा?

धूर्त वारा लागला कानास माझ्या
ऐकली नाही तुझी मी साद तेव्हा

सांगतो, ऐका! लबाडी लांडग्याची
माणसे नव्हती बरे वस्ताद तेव्हा

...मी नवा-निराळा आशय !

.......................................................
...मी नवा-निराळा आशय !
.......................................................

एवढीच ओळख माझी; एवढाच माझा परिचय !
रोजच्याच शब्दांमधला मी नवा-निराळा आशय !

सोस का तुला हा इतका ? थांबवून करशी सांत्वन...
सोसण्यात माझ्या आता हा तुझा असा का व्यत्यय ?

कोरडे तुम्ही अश्रूंनो ! दाखवा जरा अपुलेपण...
वाळवंट आयुष्याचे मी करू कशाने जलमय

तू दिलेली सोडचिट्ठी...

==================

राख  नाही, ना  कुठेही  धूर  थोडासा
काळजाचा  पेटला  कापूर  थोडासा..

भूतकाळाची  उजळणी  चालली  आहे,
दाटला  आहे  सुखाने  ऊर  थोडासा!

वाहतो  आहेस  तू  रक्तातूनी  माझ्या,
का  तरीही  वाटशी  तू  दूर  थोडासा?

तू  दिलेली  सोडचिठ्ठी  हरवली  आता-
राहिला  लक्षात  पण  मजकूर  थोडासा..

थेट  लोटांगण  अताशा  घेत  नाही  मी,
खरवडूनी  पाहतो  शेंदूर  थोडासा

चंदन


मनासारखे मन नाही
अन दुसरे साधन नाही

व्यर्थ झिजवतो देहाला
विचारात चंदन नाही!

हवे तेच उत्तर आले
पण... आले चटकन नाही

कशी रचू सुंदर कविता?
सुंदर हे जीवन नाही

दिवाळखोरीचे युग हे
रोखठोक चिंतन नाही


हा प्रवास आधी मुळीच ठरला नव्हता


हा प्रवास आधी मुळीच ठरला नव्हता
मी स्वतःहुनी हा रस्ता धरला नव्हता

मी कधी तुझ्या निष्ठांची किंमत केली?
एवढा तुझा पण भाव घसरला नव्हता

एवढे कुठे मी खरे बोललो होतो?
एवढा तुझा चेहरा उतरला नव्हता

केवढी पसरली सभोवार व्याकुळता
एवढा कुणी शिशिरात विखुरला नव्हता

एवढा कधी मी उदास नव्हतो किंवा