गझल

गझल

गर्दी...


जिथे बघावे तिथे माणसांची गर्दी
श्रीमंतांची, गोरगरीबांची गर्दी...


वेगवेगळा प्रत्येकाचा देव इथे
सदैव असते कशी उत्सवांची गर्दी?...


महाभारताहून निराळे कलियुग हे
पांडव नसतानाच कौरवांची गर्दी...


नव्हेत साधीसुधी माणसे ही सगळी
आहे ही ईश्वर बनणार्‍यांची गर्दी...


रोज नव्याने जगतो जीवन 'अजब' असे
रोज भेटते नव्या संकटांची गर्दी...

रंज की जब गुफ्तगू होने लगी.. मराठी अविष्करण.

रंज की जब गुफ्तगू होने लगी... ही गजल ऐकली होतीच. आता 'नवे ले़़ख' या सदरातून हा विषय अचानक समोर आला. दोन चार दिवस रंजच डोक्यात होती.. याच अनुरोधाने काही बरे वाईट लिहिले आहे... मनमोकळे अभिप्राय, सुचना, सुधारणा  अपेक्षित...

रंज की जब गुफ्तगू होने लगी.. मराठी अविष्करण.

सरले अंतर, वाढे जवळीक जराजराशी

कुणीच नव्हते आले निरोप देण्यासाठी ...

आई जेंव्हा जाता जाता रडली होती
काही  पाने वार्‍यावर  थरथरली होती

पुढ्यात होता आयुष्याचा उजाड वाडा
माझी छाया खिन्न मनाने बसली होती

वर्षांमागुन वर्षे विचार करतो आहे
चूक कुणाची , कशी कुठे ती घडली होती

अवती भवती जंगल होते नात्यांचे पण
जगण्यासाठी एक डहाळी पुरली होती

कुणीच नव्हते आले निरोप देण्यासाठी
माझ्यामागे धूळ

तुला या शोधती तारा

तुला या शोधती तारा
तुझ्यासाठी झुरे वारा


पुन्हा वेडावला वारा
थबकला गंध जाणारा


नको जाऊ अशा रात्री
अरे, तू एकटा तारा


दिले धोके उजेडाने
पुसू या वाट अंधारा        

मला ना पेलवे आता
व्यथांचा कोण डोलारा!


      दिलीप पांढरपट्टे

रंग नभाचे...

तुझ्यावाचुनी सखये... विरले रंग नभाचे
तुला शोधता... कुठे हरवले रंग नभाचे

तुझ्याविना एकाकी भिजणे जमले नाही
चिंब-चिंब... होवुनही हरले रंग नभाचे

शांत..  इथे मी, उदास.. तू आहेस तिथे
दोन तिरावर... रुसून बसले रंग नभाचे

किती तुझ्या अन् माझ्यामधले अंतर हे
निरोप नाही... कुठे हरपले रंग नभाचे

मनासारखी स्वप्ने, मी ही सजवित होतो
श्रावण

व्यासही माझ्यात...मी व्यासात आहे...!


मान माझी कोणत्या फासात आहे ?
अंत माझा कोणत्या श्वासात आहे ?

यामुळे मैत्री तुझी-माझी न रंगे
संशयाचा रंग विश्वासात आहे !

व्यर्थ कांगावा कशासाठी करू मी ?
मीच कोठे एकटा त्रासात आहे ?

हा रिता माझा...तुझा ओसंडलेला...
काय ही जादू तुझ्या ग्लासात आहे ?

जी तुझ्या भेटीतही नाही खुमारी

बांधुन मी...

बांधुन मी घेतल्या न भवती कधी फुकाच्या भिंती
आकाशाच्या पलीकडे निर्मिल्या यशाच्या भिंती

उन्-वार्‍याचे अन पाण्याचे... मला वावडे नाही
परिस्थितीने मजबुत केल्या आयुष्याच्या भिंती

आरोपांनी अन दुषणांनी... तडे हजारो गेले
तरी संकुचित झाल्या नाहित कधी मनाच्या भिंती

रात्रं-दिन हे दु:खच माझे... सक्त पहारा देते
म्हणुन सुरक्षित मी अन माझ्या मौन

पोरी....

नको फिरू तू उन्हात तपत्या वणवण पोरी....
तुझीच काया बनते आहे जळतण पोरी....!

खोडलेस तू लिहिता लिहिता नाव जरीही ..
कसे खोडशी हृदयावरले गोंदण पोरी....?

"दु:ख लपवले" सांगतात पडलेल्या भेगा..
तरी कितीदा तू सारवते अंगण पोरी....

'स्वप्न जेवढे सुंदर तितके कुरूप वास्तव..'
पहा स्वप्न तू, सोड पहाणे दरपण पोरी....

घासलेटच्या

श्वास



सूत मी जरा धरून पाहतो
मी मलाच चाचपून पाहतो

जो चुकून घेतलाच मोकळा 
श्वास - त्यास थांबवून पाहतो

बूंद-हौद -जाणतोच मी तरी  
का उगाच निस्तरून पाहतो?


साठवून ठेवतो खुणा खुणा
मी पुन्हा पुन्हा वळून पाहतो

ते मलाच शोधते चहूकडे
वादळास मी भिडून पाहतो

वेळ ही अशी - जपून बोलतो
मी दिसेल ते दुरून पाहतो

मी अजून शोधतोच कारणे
तो जमेल ते करून पाहतो

सापडेल, सापडेलही झरा
खोल खोल मी खणून पाहतो

मी शिव्याच देत राहिलो इथे
तो जिवास हासडून पाहतो



तसा कुणाला...

तसा कुणाला नाही मी आवडण्याजोगा
कुणाला म्हणू, "माझ्याशी प्रेमाने वागा?"...

हातावरच्या रेषा सगळ्या मिटल्या माझ्या
पायांना का पडल्या इतक्या जखमा-भेगा...

उसवत गेली का मायेची किनार ही?
कळले नाही तुटून गेला केव्हा धागा...

स्वप्नांना मी भिऊन आता झोपत नाही
रात्र-रात्र मी जाळत असतो राहुन जागा...

वसंता, तुझा भरवसा कुठे आहे उरला