कालचा प्रवास पुन्हा
तोच विजनवास पुन्हा
मी,गडे, उदास इथे
एकदाच हास पुन्हा
जाहली विराण वने
संपले सुवास पुन्हा
हा असा कसा चकवा?
तूच आसपास पुन्हा
या तुझ्याच आठवणी
हा जुनाच त्रास पुन्हा
दिलीप पांढरपट्टे
गझल
कालचा प्रवास पुन्हा
तोच विजनवास पुन्हा
मी,गडे, उदास इथे
एकदाच हास पुन्हा
जाहली विराण वने
संपले सुवास पुन्हा
हा असा कसा चकवा?
तूच आसपास पुन्हा
या तुझ्याच आठवणी
हा जुनाच त्रास पुन्हा
दिलीप पांढरपट्टे
वाच पुस्तके!
जगण्याचे जर भान पाहिजे, वाच पुस्तके
जगती जर सन्मान पाहिजे, वाच पुस्तके
ग्रंथांवाचून अर्थहीन हे अवघे जीवन
जिंदगीत जर जान पाहिजे, वाच पुस्तके
संस्कारानी घडतो माणूस, मोठा होतो
मानाचे जर पान पाहिजे, वाच पुस्तके
सहा रिपूंच्या हल्ल्यापासून वाचवणारा-
हृदयी जर भगवान पाहिजे, वाच पुस्तके
आयुष्याच्या रुक्ष कोरड्या वाटेवरती
जिंदगी झाली अखाडा
रोज खस्ता, रोज राडा
गारवा नाही मिळाला
सोसला नुसता उकाडा
दु:खितांचे गीत माझे
हा न धेंडांचा पवाडा
सूर्य क्रांतीचा उगवला
खोल रे आता कवाडा !
काय मी मेलो कळेना?
भोवती पडला गराडा
हासतो माझ्यासवे मी
पाहुनी माझा चुराडा
वेदना शब्दात आली
तूच गझले कर निवाडा
--- धोंडोपंत
.......................................................
राहिलो एकेकटे दोघे जगत....!
.......................................................
हुरहुरत तूही नि मीही तगमगत...!
राहिलो एकेकटे दोघे जगत...!
जागवत बसलो स्वतःला व्यर्थ मी
मीच माझे ऐकले नाही स्वगत...!
गंध उडतो; रंगही पडतो फिका...
शेवटी सार्या फुलांची हीच गत...!!
आणखी, माझ्या जवळ ये, आणखी...
तू जरी आहेस ह्रदयाच्या लगत...!
कोळसा समजून ज्याला फेकले
दूर
बेसुरी सुरुवात झाली जीवनाची
फक्त आलापीच आहे.. वेदनांची
भैरवी आधीच... मैफल संपवावी
ही प्रथा नाहीच कुठल्या गायनाची
ताल हा... धरलाच आहे तू चुकीचा
सम तरी सांभाळ आता... वादनाची
सूर हे जुळतील आता सांग कुठुनी ?
तार ही तुटली तुझ्या-माझ्या मनाची
वेदनेचा... षडज-पंचम लागला हा
अन सुरावट छान जमली प्राक्तनाची
बासरी
कसे मानू तुला माझा जरासा भासही नाही
तुझ्या डोळ्यात हलकासा तसा आभासही नाही
कशाला जीर्ण स्वप्नांचे मनोरे मी उभारावे
अशासाठी जवळ केले तुझे ते भासही नाही
कधीपासून स्वप्नांच्या महाली मी उभा आहे
हरवली वाट तू कोठे, वळ्ण रस्त्यासही नाही
कशी गीते मला प्रेमळ सुचावी सांग तू आता
पुरेसा लाभला तेव्हा
कधी...
कुणी आमिषे दाखवली तर कुणी पाडली भूल कधी !
कुणी सारखे नागवले मज... दिली शेवटी हूल कधी !
कधी गाव हे आवडले तर कधी भावली ती वसती...
इथे टाकले अंग कधी तर तिथे मांडली चूल कधी !
तुझी ही अशी मान हले; मग तसा त्यावरी जीव झुले...
कधी मोरणी
..का दिसेनात आता कुठे ?
ओळखीचे जुने चेहरे का दिसेनात आता कुठे ?
आपल्या माणसांची घरे का दिसेनात आता कुठे ?
सांग, झाली कधीपासुनी ही सुखासीन कांती तुझी ?
सांग ना... बोचकारे, चरे का दिसेनात आता कुठे ?
भेटलो, बोललो, हासलो काल मी ज्या सुखांच्या सवे...
...काय झाले असावे बरे