गझल

गझल

सोपे न माना

टाळणे कंटाळणे सोपे न माना
शायराला पाळणे सोपे न माना

सारखा जातो कुठे मी कोण जाणे
सारखे धुंडाळणे सोपे न माना

वेदनांची दीर्घशी कादंबरी ही
या मनाला चाळणे सोपे न माना

जेवढी येते मजा टोचून आम्हा
तेवढे किंचाळणे सोपे न माना

प्रेम नावाचा गुन्हा केलाय मीही
लोचनांचे वाळणे सोपे न

मलीन !

............................
मलीन !
............................

प्रश्न आले पुन्हा नवीन किती !
उत्तरे कालचीच दीन किती !

ग्रासले जन्म, जन्म दुःखांनी....
द्यायचे घास आणखीन किती ?

जो म्हणाला चिडून नीच तुला....
तो निघाला स्वतःच हीन किती !
 
हात फैलाव तू तुझे दोन्ही...
शेवटी पाहिजे जमीन किती ?

या घरांची विशेषणे लाखो

तारण्याची कारणे

शोधुनी काढू कशाला हारण्याची कारणे
मीच माझी जीत का नाकारण्याची कारणे

तू इथे होतीस तेव्हा कारणे होती कुठे
आणि आता ना घरे शाकारण्याची कारणे

देव देतो स्वप्न आणि तोच देतो लोचने
देत ना स्वप्नांस त्या साकारण्याची कारणे

कायसे माझ्यात? सारे जागजागी शोधती
मारण्याची आणि माती चारण्याची कारणे

हात ताणावे तिने

कळता कळता...


चंद्र लाजला नभात कैसा पळता पळता
कळेल तुजला भेद सखे हा कळता कळता...


नकोस विसरू जुन्या वाटचे लागे-बांधे...
नव्या पहाटे नव्या दिशेला वळता वळता


'अंत' नव्हे हा, 'मोक्ष' साजणा तुझा असे रे,
शमा म्हणाली  परवान्याला जळता जळता...


पुन्हा भेटुया क्षितिजावरती  दोघे आपण,
सूर्य  बोलला असेच काही  ढळता ढळता...


तिचा जरासा स्पर्श लाभला सांत्वनवेळी
अश्रूंची मग फुलेच झाली,  गळता गळता....


...हे नसे थोडके !

........................................
...हे नसे थोडके !
........................................

घुमे आज प्राणातुनी बासरी....हे नसे थोडके !
रुळू लागले गीत ओठांवरी... हे नसे थोडके !

तुझ्या जीवनातून बाहेर गेलो जरी फेकला ....
मनाची तुझ्या लाभली ओसरी...हे नसे थोडके !

नभा, श्रावणाची अपेक्षा कधी ठेवली सांग मी ?
मिळाल्या मला फक्त काही सरी...हे नसे थोडके

जिंदगी

जशी जिंदगी ढळू लागली
*तशी तशी ती कळू लागली

कुपोषणाची कीड पसरता
नवी पालवी गळू लागली

शांति-ज्योत ही पेटविल्यावर
शांतता होरपळू लागली

दुनियेची बस तुडुंब भरली
जिंदगी लोंबकळू लागली

कशास फुंकर तिने घातली?
जखम पुन्हा भळभळू लागली

जरी आंधळा तरी जगाची
नेत्रपल्लवी कळू लागली

गंध तिचा वाऱ्यावर फिरला
कळी कळी

वगैरे...



पुन्हा घेतली मी भरारी वगैरे
पुन्हा सज्ज झाले शिकारी वगैरे

खरा प्रश्न मी टाकलेलाच नाही
तुझी मात्र चर्या.. विचारी.. वगैरे

बिचारा खरोखर भिकारी निघाला
मला वाटले की पुढारी वगैरे

कशाचीच आता नशा येत नाही
तसा घाव होतो.. जिव्हारी.. वगैरे

अतीही सुगंधी नसावीत नाती
पुढे येत जाते शिसारी वगैरे

तिथे एकटा

मराठी साहित्य क्षेत्र?

चेहरे झाकून, खोटे नांव घेती
देउनी सल्ले फुकाचे, भाव घेती

कापती वाटेल ते वाटेल त्याचे
आपली राखायला ते वाव घेती

वाकडे बोलू नका जे की खरे ही
माणसांचे, माणसे ती चाव घेती

की तुम्ही काही लिहा वायाच जाते
आपल्यांना दाद देण्या धाव घेती

वाळक्या शब्दांस येथे मानचिन्हे
शब्द मेले, जे मनाचे ठाव

प्रेतयात्रा

कोरले भाग्यास मी वाळूत आहे
वादळाची हाक अध्यारूत आहे


ना कळू देणे मनाचे या जगाला
या उपायानेच मी शाबूत आहे


जात येतो, येत जातो,थांबतोही
गर्व सोडा श्वास ना काबूत आहे


ती पुढे सर्वात आनंदात चाले
प्रेतयात्रा ही जणू ताबूत आहे


वाटले सोडून द्यावे, फार झाले!
काय ना काव्यात जे दारूत आहे


 

अमर कविता

पानाफुलातुन, वृक्षवेलीतुन घडते माझी कविता
कोण्या कळीला उमलून येता स्मरते माझी कविता

फेकुन दिलेल्या बुज-या कळीला जीवन मिळते कारण...
काट्याकुट्यातुन, दगडधोंड्यातुन फिरते माझी कविता

कित्येक भिजले या आसवांनी पण खंत नसे कारण...
अश्रुही घेतो हसूनी जेंव्हा कळते माझी कविता

कवितेस माझ्या घेऊन बोटी तरती सागर कारण...
बेधुंद लाटा येतात तेंव्हा