गझल

गझल

घृणा... !

..........................
घृणा... !
..........................


कुणीतरी येईल...कधीतरी येईल !
खुळ्याच मी आशेत...खुशी घरी येईल !

बरोबरी केलीस...बरेच हे केलेस...!
तुझी किती येऊन सरासरी येईल ??

उगाच मी स्वप्नात रमे कधीपासून...
उदास आयुष्यास कळा बरी येईल !

निघून सारी लाज हसायचे लाचार...
घडी अशी निर्लज्ज, निलाजरी येईल !
 
नवे नवे सारेच...अनोळखी

जन्म हा

वाटला मला तरी सुखात जन्म हा
घेतलाय मानुषी जगात जन्म हा

रीत माहिती कुठे मला जगायची ..
तीच येथ शोधण्या दिलात जन्म हा

जात-पात-पंथ-भेद या इथे किती!
त्यावरी करेल शांत मात जन्म हा

धाय मोकली तरी कुणी न यायचे
वाहिला कुठेतरी पुरात जन्म हा

बाप कोणता न माहिती असे मला

कैकदा मेलोत आम्ही

कैकदा मेलोत आम्ही काय तुम्ही सांगता
की म्हणे मृत्यूच आहे जीवनाची सांगता

भिंत थोडी हालली अन आरसा काळोखला
जाग आली कीटकांना मी कहाणी सांगता

केवढाही धीर असला अन किती सामर्थ्यही
तू मला ऐकून होशिल पाणीपाणी सांगता

ती इथे आलीच नसता गंध दरवळला कसा
की तुम्ही खोटेच मजला रातराणी सांगता

गझल

वखवखे मला

सहज सांगतात दोष सारखे मला
करत राहतात लोक पारखे मला

वलय आखतात आखतात वर्तुळे
टाकताच पाय बोचती नखे मला

वाटणी समान जाहलीशी वाटते
स्वर्ग त्यास लाभले नी दोजखे मला

माझी वाट पाहते समजताच मी
पाहते अशी जशी न ओळखे मला

नाजुकी तुझी फुलाहुनी अधीक तर
सांग माळतेस का फुले सखे

शौकीन का आहे

अपयश माझे इतके शौकीन का आहे
प्रत्येक यशाचे ते जामीन का आहे

टाळ प्रिये मजला डिवचू नकोस बघुनी
खोटे हसण्याइतका मी हीन का आहे

चारित्र्य पाहुनी ती लाथाडते प्रेमाला
तिला विचारा की ते मलीन का आहे

कवितेचे गणिताचे प्रेम पाहुनी कळ्ले
प्रत्येक गझल माझी विचाराधीन का आहे

मदिरा मी घेतलेली

माणसे

प्रेमवेडी संत मोठी छान होती माणसे
खानदानी काळ्जाचे भान होती माणसे

आणभाका घेवुनीया पाळणारे कोण हो
टाळ्वाली पांडुरंगी  ध्यान होती माणसे

पावसाची सावकारी फार वेळा पाहिली
पीकपाणी जाळ्णारी रान होती माणसे

आठवांनी मंद झाला श्वास माझा केवढा
सोंगटीचे शेवटाचे दान होती माणसे

लेकरांना कोण नेई रोज मंदिराकडे
देउळाला पायरीचा मान

मिळो

रहाया सुखाचे निवारे मिळो
जगाला सुगंधी फवारे मिळो

कुणी शाप द्यावे कुणाला किती
हरेकास येथे किनारे मिळो

सदा उंच न्यावा यशाचा झुला
नव्या वैभवाला मिनारे मिळो

जरी पाहिले ना कुणीही  किती
जुन्याला नवे हे भिणारे मिळो

बहरताच स्वप्ने कळ्यांची नवी
फुलाया फुलांना शहारे मिळो

बिजांना सुचावे नव्याने उगी
रुजाया पिकांना

कुणी इथे

अता नाही तसे कुणी इथे
तरी गाली हसे कुणी इथे ?

अशा ताज्या अजूनही खुणा
जसे पूर्वी फसे कुणी इथे

उभे वाटेत राहती जसे
बनूनीया ठसे कुणी इथे

मी नाही, ही फुलेच सांगती -
तुझ्याहुन छानसे कुणी इथे!

कसे रे आज गप्प हे झुले?
जसे काही नसे कुणी इथे

जरी अश्रू दिसे फुलांवरी
न दु:खी फारसे कुणी इथे

राहुदे मजला कवी

सांग का त्रासून जावे 'भूमिका बदला नवी'
सांग का माणूस व्हावे राहुदे मजला कवी

त्यात ना कंजूष कोणी की कुणी गमजा करी
जात ना लावूस राहो मोकळा उडता कवी

राग ना ना डूख धारे की न तो हेवा करी
लागता त्या भूक चाखे कीमती दु:खा कवी

सारखा पाउस आहे की

तुझ्यास्तव.....

अता पावसाला मलाही रडू दे
तुझ्या हातच्या मेंदिलाही कळू दे

अता सोडली आठवे या किनारी
उद्याला तुला त्या किनारी मिळू दे

तुला दु:ख झालेलं पाहू कसे मी
तुझ्यापासुनी दु:ख माझे दडू दे

तुला स्पर्श लाभावया चांदण्याचा
इथे सूर्य वक्षात माझ्या जळू दे

ऋतूंच्यासवे मी मला शोधताना
वसंतात या तू मला